*काँग्रेसचा भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 27/09/2021 9:32 PM



चंद्रपूर : केंद्रातील जुलमी व अत्याचारी भाजप सरकारविरोधात सोमवारी (ता. २७) भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात चंद्रपूर शहर जिल्हा आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेसने सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकुमशाही राजवटीने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कायद्यामुळे संपूर्ण देशाची आर्थिकस्थिती ढासळली आहे. हे कायदे मागे घेण्यात यावे, यासाठी जगाचा पेशिंदा मागील ११ महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे. तरी या जुलमी सरकारला त्यांची किव येत नाही. उलट त्यांचा क्रूर पद्धतीने छळ केला जात आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस कृत्रिम महगाई निर्माण करून अदानी, अंबानी सारख्या उद्योगपतींचे खिशे भरण्याची खेळी मोदी सरकारकडून सुरु आहे. देशातील तरुणांना बेरोजगार करण्यात आले आहे. त्यामुळे या जुलमी व अत्याचारी भाजप सरकारविरोधात भारतबंद...

Share

Other News

ताज्या बातम्या