*शिवविचार प्रतिष्ठान*
*२६ जून इ.स.१६६४*
सुरतच्या इंग्रजांचे कारवारच्या इंग्रजांना पत्र. पत्राद्वारे त्यांनी छत्रपती शिवरायांपासून सावध राहण्याचा इशारा दिला.
*२६ जून इ.स.१६७७*
#दक्षिण_दिग्विजय_मोहीम
दक्षिणेतील "तिरूवाडी" येथे छत्रपती शिवराय मुक्कामी. येथेच मुघल सरदार शेरखानवर मराठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात शेरखान पळून गेला.
---------------------------
*२६ जून इ.स.१६८०*
छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीराजेंनी रायगडावर येऊन आजच्या दिवशी स्वराज्याचा राज्यकारभार आपल्या हाती घेतला.
*जून २६ , इ.स. १८७४* रोजी शाहू महाराजांचा जन्म कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २ , इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.