कोरोना -१९ महामारीतील मागील ३ महिन्याच्या लॉक डाऊन मध्ये वीज ग्राहकांना सरासरी बिल पाठवले गेले ते ग्राहक भरत असताना अचानक जून-जुलै मध्ये ग्राहकांना भरमसाठ वीज बिल मेसेज /ऑनलाईन देण्यास वीज वितरक कंपन्यांनी चालू केले.यामुळे कल्याण-डोंबिवली मधील ग्राहंकानमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.त्यांना रस्त्यावर उतरून वीज कंपनींना जाब विचारण्यास कोरोना महामारी मधील लॉक डाऊन च्या काळात सरकारने भाग पाडले.हा ग्राहकामाधील मधील असंतोष जिल्हा/राज्य स्तरावर होत असताना स्वाभिमानी रिपब्लिक पार्टी डोंबिवली यांनी वीज महावितरण अभियंता,कल्याण विभाग यांना वाढवलेले वीज बिल कमी करणे व वाढवलेले युनिट रेट कमी करण्यासाठी निवेदनाचा अर्ज दिले या विषयावर चर्चा सुधा करण्यात आली.यावेळी स्वाभिमानी रिपब्लिक पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव आंबोरे,उप अध्यक्ष अनिल सरदार,डॉ.महेंद्र बाविस्कर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यानी निवेदनामध्ये सांगितले आहे कोरोना महामारीत जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.नागरिकांचे रोजगार निघून जात आहे.जनता आत्महत्या करत आहे.अश्यावेळी हा वीजदरामार्फत सरकार कडून चाललेला जनतेचा छळ चुकीचा आहे.आपण तात्काळ यावर उपाय योजना कराव्या व या करोना संकट मधील ३०० युनिट चे बिल माफ करावे व जनतेची लुट थांबवावी.अन्यथा शासनाच्या निषेदार्थ मोर्चा व आंदोलना शिवाय पर्याय नाही.