पाडळी शिंदे(स्वप्नील शिंदे):-सततची नापिकी कोरडा दुष्काळ व गेल्या वर्षीच्या पाठोपाठ याही वर्षी ओल्या दुष्काळाने शेतकरी पुरता जेरीस आला असून व सततच्या पावसाने व वादळी वाऱ्याने व शेतात पाणी साचल्याने ऐन भरात असलेली पिके खराब झाली व सोयाबीन अंकुरले तर कपाशीची पाते गळ व बोड्या काळ्या पडल्या व कपाशी पीक मोडले असल्याने पाडळी शिंदे सह परिसरातील सुरा नागणगाव सावखेड नागरे मेंडगाव बायगाव शिवणी आरमाळ या गावातील मुंग उडीदा पाठोपाठ आता सोयाबीन व कपाशी ही पिके खराब झाली असून शेतकरी वर्गापुढे अस्मानी संकट उभे ठाकले आहे शासनाकडून पंचनामे प्रत्यक्षात। केव्हा केले जाणार व नुकसान भरपाई केव्हा मिळणार याकडे परिसरातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे तसेच गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सतत च्या पावसाने मुंग उडीद यांच्या पाठोपाठ आता सोयाबीन पीक ऐन भरात असताना उभा असलेल्या सोयाबीन च्या शेंगा मधूनच अंकुर उगवल्याने शेतकरी वर्ग यांच्या पुढे संकट उभे राहिले आहे तसेच नगद पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी पीक सुद्दा भरात असून त्याच्या सुद्दा बोड्या सडल्या असून पाते गळ होत असून बहुतेक सोयाबीन व कपाशी शेतातून पाणी वाहत आहे त्यामुळे पिके खराब झाली असून गेल्या पंधरा दिवसात या परिसरात दोन वेळा वादळी पावसाने झोडपल्याने कपाशी पीक मोडले आहे आता शेतकरी वर्गाची अवस्था "राजाने मारले -निसर्गाने छळले "तर तक्रार कुणाकडे करावी अगोदरच कोविड आजाराने थैमान घातले त्यात काहींची कर्ज माफी झाली तर काहींची होणे बाकी व दोन लाखवरील कर्जधारक यांना सुद्दा शासनाने घोषित केले प्रमाणे दोन लाख रुपये कर्ज आध्यापपर्यंत माफ केले नाही काही शाखांकडून नवीन कर्ज देतांना अक्षम्य दिरंगाई तर काही कडून नवीन कर्ज धारक यांची पायपीट होत आहे या कर्ज माफीच्या नादात अनेक जण थकीत असून ते आज कर्ज माफ होईल उद्या होईल या आशेवर बसले असून प्रत्यक्षात कर्जमाफी प्रकिया पूर्ण होणार तरी केव्हा हा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच विमा संरक्षण केलेल्या शेतकरी वर्गांची पीक नुसकाणीची माहिती कंपनीला देण्यासाठी टोल फ्री नंबर वर वारंवार संपर्क साधून सुद्दा विमा कंपनी शी संपर्क होत नाही तसेच क्रॉप इन्शुरन्स ऑप मधून पीक नुकसानीची माहिती भरण्यासाठी अनेक शेतकरी यांच्या कडे अँडराइड मोबाईल नाही तर अनेकांकडे असून माहिती भरताना त्रास दायक वाटत असल्याने पीक नुकसान माहिती देण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करीत आहे तर विमा नसलेल्या शेतकरी वर्गाला शासनाकडून मदतीची अपेक्षा लागून राहिली आहे प्रत्यक्षात पीक नुकसान पंचनामे कधी सुरू होणार व त्याची अंमलबजावणी केव्हा व नुकसान भरपाई केव्हा मिळणार व ती मदत तुटपुंजीच मिळणार ? तसेच मुंग उडीद नुसकाणीचे पंचनामे झाले परंतु त्याची मदत केव्हा मिळणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे एवढे मात्र निश्चित!