तुळजापुर ते लातूर या महामार्गावर काक्रंबा गावामध्ये रस्त्याचे काम चालू असताना व सध्या तालुक्यामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असताना पावसामुळे मोठ- मोठे खड्डे झाले होते. त्यामुळे त्या ठिकाणी खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे ते खड्डे आज प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुका उपाध्यक्ष मा. जुबेर भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज काक्रंबा शाखेच्या वतीने महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे काक्रंबा येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी शाखाप्रमुख जाकिर अन्सारी, अकबर अन्सारी, मोसिन पठाण, महबूब अन्सारी, सोमनाथ झाडे, बाबू पेंटर इत्यादी प्रहार सेवक उपस्थित होते.