उदगीर तालुका प्रतिनिधी (ता.28)
सबंध उदगीर तालुक्यामध्ये अनाधिकृत विटभट्ट्यांनी धुमाकूळ घातला आहे. वीटभट्टी मालकांनी विना पोल्युशन सर्टिफिकेट वीटभट्टी चालू करत संबंधीत प्रशासनाला चिरीमिरी ठेवून हवेत दूषित हवा
मिसळण्याचे काम करत असून आत्ताच आपला देश कोरोणा सारख्या महामारितून मुक्त होवू पाहत आहे तर लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात
वीटभट्टी ने हवा प्रदूषित करत जनतेचे आरोग्य धोक्यात घालण्याचे काम चालले आहे. तरी संबंध तालुक्यातील जनतेतून ज्या वितभट्ट्यांना परवाना मिळाला आहे अशा मोजक्याच भट्ट्या चालू ठेवून बाकी सर्व अनाधिकृत भट्ट्या बंद करून हवा दूषित होण्यापासून प्रतिबंध करण्याची मागणी केली जात आहे..