ॲड.श्रीहरी बागल याचा महायुतीला जाहिर पाठिंबा

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 20/04/2024 9:27 PM

            

आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)


राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे न करता भारतीय जनता पार्टी महायुतीला जाहिर पाठिंबा - ॲड.श्रीहरीबागल                                 

मायणी : 
मुंबई राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी वीस दिवस महाराष्ट्र दौरा करून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भ येथील पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेटी घेऊन मेळावे घेऊन महायुती चे काम केले आहे.पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर केला की, आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहोत.हा मुंबई  येथे पत्रकार परिषद घेऊन श्रीहरि बागल यानी महाविजय २०२४ साकार करण्यासाठी सर्वांना दौरा करत असताना एकत्र करुन नियोजन बद्ध काम केले आहे.यावेळी बागल साहेब म्हणाले की,राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा धर्म पाळणे आपले कर्तव्य आहे.व आपण महायुती चे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज असल्याने काही नाराज लोकांनी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्ष लोकसभा २०२४ निवडणूक स्वबळावर लढणार असा संभ्रम निर्माण केला होता.तो संभ्रम दुर करून पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.काल पहिल्या टप्प्याचे मतदान चांगल्या प्रकारे झाले आहे. तसेच उर्वरित दुसरा,तिसरा,चौथा व महाराष्ट्रातील शेवटचा पाचवा टप्प्यातही भरघोस मतदान महायुतीचा उमेदवारांना करुन लोकशाहीचा उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांच्या चिन्हावर कोणताही उमेदवार लोकसभा निवडणूक २०२४ लढवणार नाही.राज्यात अनेक ठिकाणी पक्षाकडे सक्षम उमेदवार असतानाही पक्षाने स्वतः निवडणूक न लढवता महायुतीचे  काम करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परत तिसऱ्या वेळेसही पंतप्रधान होण्यासाठी मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.श्री.आमदार प्रसादजी लाड साहेब समन्वयक (पक्ष व सरकार) यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचा महाविजय २०२४ साकार करण्यासाठी काम करणार आहे असे आश्वासन या वेळेस सर्वांना दिले आहे .

Share

Other News

ताज्या बातम्या