आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
*वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी चांगले नियोजन करा*
*- ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे*
सातारा दिनांक : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने यात्रेकरू येतील. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने चांगले नियोजन करावे. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी बारड, फलटण, तरडगाव, लोणंद, नीरा दत्त घाट पालखी तळांची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या निरीक्षण प्रसंगी आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सीईओ यशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपायुक्त तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, …