सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक सध्या अनेक समस्यांनी त्रस्त आहेत.या समस्या बाबतीत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून म्हणावी अशी दखल घेतली जात नसल्याने ,नागरिकांची हीच गरज ओळखून महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्तासाहेब यांनी नागरिकांसाठी तक्रार निवारण केंद्राची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे .या तक्रार निवारण केंद्राद्वारे अवघ्या दीड महिन्यामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केलं जाणार असल्याचं आयुक्त गुप्ता यांनी सांगितलंय.हे त्यांचे काम अत्यंत कौतुकास्पद असून ,लोकहित मंचच्या वतीने समस्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो .
साहेब तुमच्यासारखा तरुण,तडफदार आणि कार्यतत्पर आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मिळाला हे आम्ही आमचे भाग्य समजतो .
मनोज भिसे
(अध्यक्ष,लोकहित मंच)