सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात पथदिव्यांच्या (Street Lights) दुरावस्थेमुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. लोकहित मंच, सांगली च्या वतीने आम्ही प्रशासन आणि आयुक्त मॅडमकडे तात्काळ कारवाईची मागणी करत आहोत.
आमचे प्रमुख प्रश्न आणि समस्या:
📍 नवीन आयर्विन पूल: शहराचा मुख्य कणा असलेल्या या नवीन पुलावर विजेचे खांब तर आहेत, पण त्यावर अद्याप लाईटच लावण्यात आलेले नाहीत. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला पूल रात्रीच्या वेळी अंधारात का?
📍 चिंतामणी नगर पूल (माधवनगर रोड): नवीन पुलाचे काम पूर्ण होऊनही इथे पथदिव्यांची सोय नाही. अंधारामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
📍 १०० फुटी रोड (छत्रपती शाहू महाराज मार्ग): या मार्गावरील विजेच्या खांबांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक खांब गंजलेल्या अवस्थेत आहेत. बहुतांश दिवे बंद असल्याने नागरिकांना असुरक्षित वाटते.
केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष कृती हवी!
- मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.