अहमदनगर;-मागील आठवड्यात अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली होती.
या प्रकारावर नाराजी दर्शवत शिवसेनेने आमच्या नगरसेवकांना परत पाठवा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले होते.
'यांनी' केली मध्यस्ती :दोन्ही पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी हे प्रकरण समोपचाराने सोडवत हे नगरसेवक लवकरच पुन्हा शिवसेनेत परतणार असल्याची माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्ती करत या प्रकरणी महत्वाची भूमिका बजावली आहे. या 5 नगरसेवकांनी मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून लवकरच हे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतणार असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, महाविकास आघाडीतील घटकपक्षानेच नगरसेवक फोडल्यामुळे उभ्या राहिलेल्या नाराजीनाट्याला यामुळे पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत.