माननीय मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब,
महाराष्ट्र राज्य
विषय-- सांगली जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत
महोदय,
सांगली जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असून, प्रश्नांबाबत आपण लवकरात लवकर पुढाकार घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करावी याविषयी आम्ही आपणाकडे सदर निवेदनाद्वारे मागणी करत आहोत.
सांगली जिल्हा मध्ये कवलापूर गावच्या हद्दीमध्ये विमानतळ व्हावे अशी अनेक दिवसांपासून ची मागणी प्रलंबित असून या संबंधाने अनेक सामाजिक संघटना राज्यकर्ते यांनी सरकारकडे याविषयी मागणी केली आहे तरीसुद्धा याबाबतीत तोच उपाययोजना झालेली नाही. शिवाय सांगली शहरा तील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही कारण कृष्णा नदीमध्ये सांगली शहरातील शेरी नाला मोठ्या प्रमाणात मिसळत असल्याने नदीचे पाणी दूषित झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे. या शेरी नाल्याबाबतही आपण योग्य सूचना देऊन याबाबत आपल्या स्तरावर कारवाई करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने आम्ही करत आहोत.
शिवाय सांगली शहरांमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भगदाडे पडण्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. त्याचबरोबर सांगली मिरज रस्ता हा चांगला असतानाही त्यावर पुन्हा नव्याने फक्त कार्पेट टाकून डांबरीकरण करण्याचा प्रकार दिसून येत आहे. या निमित्ताने फक्त ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टरला पोहोचण्यासाठीच नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. याकडेही आपण लक्ष घालून ताबडतोब चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने आम्ही करत आहोत.
गेल्या अनेक वर्षांपासून सांगली जिल्ह्यासाठी ड्रायपोर्ट व्हावा अशी मागणी लोकांमधून होत आहे परंतु अनेक वेळा ड्रायपोर्ट साठी जागा मिळाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले परंतु आज तागायत याबाबत ड्रायफोर्ट साठी जागा मिळाली नाही. यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यावी. 93 कोटी भुयारी योजना मंजूर करण्यात यावी याशिवाय सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये अनेक रोजंदारी आणि मानधन तत्वावर कर्मचारी काम करत आहेत परंतु त्यांना वेळेवर पगार मिळत नाही.शिवाय त्यांना कायम करण्यात यावे अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने करत आहोत.
या सर्व मागण्या बाबत आपण लवकरात लवकर तोच निर्णय घ्यावा ही नम्र विनंती!
कळावे,
मनोज भिसे,
अध्यक्ष, लोकहित मंच सांगली.