प्रशासनाचा चुकलेला प्राधान्यक्रम, मा. नगरसेक अभिजीत भोसले " रोज एक नवीन विषय " च्या दालनात, व्हीडीजो पहाच...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/06/2025 6:36 PM


#प्रशासनाची_नसलेली_इच्छाशक्ती 

खालचा व्हिडिओ सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने जरूर पाहावा, 
https://www.facebook.com/share/r/1EU636ND54/?mibextid=wwXIfr

कारण प्रशासन म्हणून काम करत असताना एकतर प्रशासनाला नागरिकांसाठी लोकांसाठी काम करायची इच्छाशक्ती नाहीये, किंवा मग त्यांना प्राधान्यक्रम ठरवताना लोकांच्या गरजा त्यांच्या प्राथमिक जगण्यातल्या अडचणी प्रशासनाला दिसत नाहीयेत असंच म्हणावं लागेल.
    गुंठेवारी विस्तारीत भागातील लोक जगण्यातल्या प्राथमिकतेला प्रशासनाकडे हात पसरत आहेत, रस्ते लाईट पाणी ड्रेनेज व गटारी यासारख्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची मागणी गुंठेवारी आणि विस्तावरीत भागातील नागरिक करतात, आणि प्रशासन मात्र उघड्या डोळ्याने त्यांच्याकडे डोळेझाक करते.
      एकीकडे 50-50 कोटीचे रस्ते स्टेशन रोड स्टॅन्ड रोड आणि शहरातील मुख्य रस्त्यावर हॉट मिक्स चे थरावर थर चालू आहेत आणि महापालिकेतील विस्तारित भागातील जनतेला दलदलीच्या रस्त्यातून चालावं लागतं, एकीकडे काळाखणी मध्ये म्युझिक कारंजासाठी पाच पाच कोटी रुपये खर्च होत आहेत आणि शहरातील जनतेला पिण्यासाठी पुरेसं शुद्ध नियमित पाणी नाही, भारी किमतीच्या 50 लाखाच्या गाड्या घ्यायला निधी आहे पण शहरातील जनतेला पाणी पुरवायचं म्हटलं तर स्टेनलेस स्टीलचे टँकर घ्यायला निधी उपलब्ध नाही शोकांतिका आहे की गंजलेल्या टँकर मधून पाणी पुरवठा होतो आणि तेही टँकर एखाद दुसरा आहे, गरज नसताना चांगल्या प्रिंग ब्लॉकच्या फुटपाथ वरले पेविंग ब्लॉक काढून नवीन फुटपाथ साठी एक एक कोटी रुपये खर्च करत आहे आणि विस्तारित भागातील जनतेला अंधारातून चालायला लावताय, घंटागाडी सहा वाजून गेल्यानंतर उशिरा निघाली तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वर कारवाई करणार आणि 2012 साली मंजूर झालेली ड्रेनेज योजना आज तागायत पूर्ण झाली नाही म्हणून दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, मनपा अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर विना निविदा दोन दोन कोटी रुपये खर्च होतात आणि शहरातील जनतेला मात्र विकास कामांसाठी प्रशासनाकडे हात पसरून भिक मागावी लागते, दुर्दैव आहे पण हेच वास्तव आहे.
 
           आता नवीन आयुक्त आलेत निश्चित पणाने त्यावरती सकारात्मक काम होईल अशी दरवेळेस वाटणारी अपेक्षा यावेळेस सुद्धा वाटत आहे. किंबहुना या दलदली वरती मार्ग काढण्यासाठी मा आयुक्त सत्यम गांधी यांनी आवश्यक असणारी योग्य कामगिरी सुरू केली आहे. केवळ तोंडदेखलं आश्वासन न देता आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योग्य भूमिका ते घेतायत याबद्दल त्यांचे मी आभार मानेल, आणि मी त्यांच्याकडे प्रस्तावित केलेल्या कामासाठी लोकांच्या कामासाठी जर त्यांनी न्याय दिला तर आईक साहेबांचा जाहीर नागरिक सत्कार मी निश्चित करेल. आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आपण दोघेही नागरी अपेक्षेस आणि न्याय भूमिकेस प्राधान्य द्याल अशी सकारात्मक आशा वाटते.
SachinBhau Kadam खुप खुप धन्यवाद, आपण आणि आपल्या चॅनेल च्या माध्यमातून योग्य विषयास वाट करून दिलीत.. आभारी आहे.

मा नगरसेवक 
अभिजित भोसले सां मि कु मनपा

Share

Other News

ताज्या बातम्या