निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर पुढाकार यांचा पुढाकार
मिरज व अर्जुनवाड नागरिकांचा सहभाग
कृष्णा नदी जी आपल्या भागाची अस्तित्वरेखा आहे, अन्नदाता आहे, आणि संस्कृतीचा प्रवाह आहे, तिची प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढते आहे. कचरा, प्लास्टिक, घाण या पवित्र नदीला गुदमरू पाहत आहेत.नदीला वाचवण्यासाठी जयतु कृष्णे अभियानाची सुरुवात करण्यात आली . ‘जयतु कृष्णे अभियान’ म्हणजे केवळ नदी स्वच्छतेची चळवळ नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी आपली जीवनदायिनी नदी वाचवण्याचा जागर आहे. निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांच्या पुढाकाराने दिनांक 1 जून रोजी या अभियानाची भव्य सुरुवात झाली असून, आज मिरज कृष्णा घाटावर श्रमदानाच्या रूपाने या मोहिमेला नवे बळ मिळाले.
आज मिरज कृष्णा घाटावर 100 स्वच्छतादूतांकडून सकाळी 2 तास श्रमदान करीत जवळपास 3 टन कचरा संकलन करण्यात आले.या मोहिमेदरम्यान निर्माल्य, प्लास्टिक,कपडे व अन्य कचरा आढळून आले.
राकेश दड्डणावर म्हणाले कृष्णा नदी फक्त एक पाण्याचा प्रवाह नाही ती आपली आई आहे. तिच्या संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाचे पुढे येणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही ‘जयतु कृष्णे’ अभियानाची सुरुवात केली आहे. फक्त एक गाव नाही तर उगमापासून ते संगमापर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. आज मिरज येथे नागरिकांनी ज्या उत्साहाने श्रमदानात भाग घेतला, ते पाहून विश्वास वाटतो की ही नदी आपण नक्की वाचवू. येत्या काळात घरोघरी जाऊन जनजागृती, सर्व भागांमध्ये श्रमदान, आणि युवा पिढीला या मोहिमेशी जोडणे हे आमचे ध्येय आहे.
आजच्या मोहिमे अर्जुनवाडचे सरपंच ग्रामस्थ, कृष्णामाई स्विमर्स ग्रुप,इन्फोर्स फाऊंडेशन,योगा ग्रुप,श्रीनिधी ग्रुप, स्थानिकांनी सहभाग नोंदविला.तसेच योगेंद्र थोरात, राजाभाऊ देसाई,राजू माळी, प्रदीप चौगुले,कांतीनाथ दुधगावे,वैभल चव्हाण,सुरेश चौगुले,विकास पाटील,वैभव कुलकर्णी,बजू बोर्दे,नंदकुमार पाटील आणि अनेक कृष्णामाई प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.