पी.एम.ओ;-देशाच्या 80 कोटी गरीब नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य दिलं जाणार, दर महिन्याला 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ मोफत दिले जातील, सोबतच प्रत्येक परिवाराला दर महिन्याला 1 किलो डाळ मोफत दिली जाणार
अनलॉक 1 सुरु झाल्यापासून बेजबाबदारपणा वाढला आहे. पूर्वी मास्क, हात धुण्याबद्दल सतर्क होतो, आता नाहीत
2 फूट दूरी, मास्क वापरणे, हात वेळोवेळी धुणे हे नियम कटाक्षाने पाळा
सरकार ज्यांच्यामुळे हे सगळं करते असे ते दोन घटक आहेत. एक शेतकरी आणि दुसरे प्रामाणिक करदाते
09 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले गेले आहेत
गेल्या 03 महिन्यांत 20 कोटी जनधन खात्यांमध्ये सरळ 31 हजार कोटी रुपये जमा केले गेले
लॉकडाऊन झाल्यानंतर लगेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर करण्यात आली. त्यातून गरीबांना 2 लाख कोटी रुपयांचं पॅकेज दिलं गेलं
प्रशासनाच्या प्रत्येक घटकाने हाच प्रयत्न केला की देशातलं कुणीही उपाशी राहू नये
लॉकडाऊन दरम्यान प्रत्येक घरात चूल पेटेल हेच प्राधान्य राहिलं आहे.
या देशात सामान्य असो वा पंतप्रधान कुणीही नियमांपेक्षा मोठं नाही, 130 कोटी जीवांना वाचवायचं आहे
आज मंगळवार दी 30जून २०२० रोजिची मोठी बातमी..