आपल्या सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळ बाबत अर्थ संकल्पात कोणीही घोषणा केली नाही.
महानगरपालिका निवडणुकी मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केली होती. सरकारमधील सगळे नेते केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना भेटून फोटो टाकतात, बातम्या देतात.मात्र प्रत्यक्षात कारवाई काहीही दिसत नाही.
का फक्त सांगलीत येऊन लोकप्रिय घोषणा करायच्या आणि जायचे आणि सवंग लोकप्रियता मिळवायची असेच सध्या दिसत आहे.
याबाबत सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व्यक्त व्हावे अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.