राज्यस्तरीय वधू–वर परिचय संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/12/2025 1:43 PM

नांदेड :- महाराणा प्रतापसिंहजी राजपूत क्षत्रिय समाज समिती, नांदेड यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राजपुत क्षत्रिय संघ आणि" राणा ग्रुप "यांच्या संयुक्त सहकार्याने रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय वधू–वर परिचय संमेलनाचे उद्घाघाटन माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव बोंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओम गार्डन, कौठा नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात एकूण ५०७ तरुण–तरुणींनी आपला परिचय दिल्याने सामाजिक स्तरावर एक नवीन विक्रम नोंदविला गेला.

हे संमेलन स्वर्गीय "देवीसिंह कुँवरसिंह चौहान "यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह हजारी होते. व्यासपीठावर लातूरचे माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह ठाकूर, पृथ्वीसिंह बायस व शरदसिंह चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.संयोजक अमरसिंह चौहान यांनी आपल्या प्रास्ताविकात संमेलन आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना, समाजातील तरुण पिढीला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे व विवाह विषयक संवाद सुलभ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी आपल्या भाषणात वधू–वर परिचय संमेलने ही केवळ विवाहाचीच नव्हे, तर सामाजिक समन्वय आणि विश्वास वृद्धिंगत करण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

आ. बालाजीराव कल्याणकर यांनी राजपूत समाजाची इतिहासातील गौरवशाली परंपरा, शौर्य आणि देशसेवेतील योगदान अधोरेखित करत, हा समाज सदैव राष्ट्रहितासाठी अग्रभागी राहिलेला आहे असे नमूद केले.आ. आनंदराव बोंडारकर यांनी मार्गदर्शन करताना राजपूत समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांच्या निराकरणासाठी आपण नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर असल्याची ग्वाही दिली.मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्ष दिलीपसिंह हजारी यांनी महाराष्ट्रभर राजपूत समाजातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक उपक्रमांची माहिती दिली. सचिव मोहनसिंह तौर यांनी आभार प्रदर्शन केले.

परिचय सत्रास सुरुवात झाल्यानंतर 507 तरुण व तरुणींनी व्यासपीठावर जाऊन आपला परिचय दिला. धर्मभूषण ॲड. दिलीपसिंह ठाकूर यांच्या मार्मिक, मुद्देसूद आणि प्रसंगानुरूप विनोदाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. परिचय देणाऱ्या प्रत्येक सहभागीला भेटवस्तू देण्यात आली, तर उत्कृष्ट परिचय देणाऱ्या तीन तरुण व तीन तरुणींना आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात आली.यावेळी परीक्षक म्हणून इंदिरा चौहाण व राम चव्हाण यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल अमरसिंह चौहान व आकर्षक संचालन केल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. “राणा ग्रुप” तसेच “राणी पद्मिनी राजपूत महिला ग्रुप”चा ड्रेस कोड संमेलनात विशेष चर्चेचा विषय ठरला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालासाहेब कच्छवे, प्रकाशसिंह परदेशी, रवींद्रसिंह गौर, विठ्ठलसिंह गहेरवार, रतनसिंह चौहान, देवेंद्रसिंह चंदेल, संजयसिंह अवस्थी, रघुवीरसिंह हजारी, गंगासिंह ठाकूर, आनंदसिंह चंदेल, बाबूसिंह चौहान, विजयसिंह चौहान,किशनसिंह चंदेल, संजयसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, शैलेंद्रसिंह चौहान,अर्जुन सिंह ठाकूर यांनी परिश्रम घेतले.महाराणा प्रताप यांची छबी असलेली रांगोळी, आलेल्या प्रत्येकाचे राणी पद्मिनी ग्रुप तर्फे करण्यात आलेल्या औक्षण, उत्कृष्ट ध्वनी व व्हिडिओ स्क्रीन व्यवस्था, रुचकर भोजन आणि भरगच्च भरलेले सभागृह यामुळे हे संमेलन संस्मरणीय ठरले.

Share

Other News

ताज्या बातम्या