सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारा भूखंड अखेर सर्व जागरूक सांगलीकर जनतेच्या लढ्यामुळे वाचला आहे.सर्वपक्षीय कृती समिती सांगली यांच्या वतीने उभारलेल्या विमानतळ बचाव कृती समितीच्या वतीने उभारलेल्या लढ्याला मिळालेलं हे आणखी एक मोठं यश आहे असेच म्हणावे लागेल.
शासनाने याठिकाणी छोटे भूखंड तयार करून MIDC मार्फतच प्लॉट विक्री करून नवउद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत हीच मागणी कायम आहे.
या आंदोलनात सहभागी सर्व गावकरी,सर्वपक्षीय कार्यकर्ते,सामाजिक संस्था,राजकीय नेते व या आंदोलनाला प्रसिद्धी देणारे सर्व वर्तमानपत्रांचे पत्रकार बांधव यांचे मनःपूर्वक आभार व तमाम सांगलीकरांचे अभिनंदन 💐💐