संकल्प ते सिद्धी' उपक्रम कार्यशाळा !📍सांगली |
देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांचा कार्यकाळ हा देशासाठी नव्या युगाचा आरंभ ठरला. गेल्या ११ वर्षात देशाने अविरत प्रगतीपथावर वाटचाल केली आहे.
मोदी सरकारच्या ११ वर्षपुर्ती निमित्त 'संकल्प ते सिद्धी' या उपक्रमाची कार्यशाळा सांगली येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मोदी सरकारने गेल्या ११ वर्षात उज्ज्वला योजना असो किंवा प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, भारतीय जनऔषधी केंद्रं असोत किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी; अशा अगणित योजनांच्या माध्यमातून जनकल्याणाचा नवा आयाम रचला.
देशाची विकासगाथा आणि योजनांची उपयोगी माहिती समाजाच्या तळागाळात पोहचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना संबोधन दिले.
कार्यशाळेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ. नीताताई केळकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस मा.मोहन वाटवे, मा.विश्वजीत पाटील, मा.प्रवीण जाधव तथा सर्व मंडल अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.