शिक्षण मंडळ भगुर संस्थेच्या वतीने उद्धबोधन शिबीर संपन्न...... शुक्रवार दिनांक 13 रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित सर्व शाखेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 संदर्भात उद्धबोधन शिबिर नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प शाळेत संस्थेने आयोजित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री.एकनाथराव शेटे यांनी भूषविले. प्रमुख वक्ते मा.श्री.भाई उपाले (विद्याभारती, क्षेत्रीय पदाधिकारी) हे लाभले.मा.श्री.उपाले यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 ची उद्दिष्टे,अंमलबजावणी तसेच शिक्षक व पालक यांची भूमिका इत्यादी संबंधी सविस्तर विवेचन केले. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मा.श्री.प्रकाशजी पाठक(ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्र प्रांत संयोजक विवेकानंद केंद्र) वक्ते म्हणून लाभले. त्यांनी देखील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 आणि शिक्षकाची भूमिका याविषयी सखोल माहिती सांगितली. जीवनातील शिक्षणाचे व शिक्षकाचे महत्त्व स्पष्ट केले.त्यांनी शिक्षक हा विद्यार्थ्याचा सर्वांर्थाने शिल्पकार असल्याचे विविध उदाहरणातून स्पष्ट केले,याप्रसंगी विद्याभारतीचे पदाधिकारी मा.श्री.मुकुंदजी बागुल संस्थेचे कार्यवाह मा.श्री.सचिन पाटील सर सहकार्यवाह मा.श्री.जितेंद्र भावसार कार्यकारिणी सदस्या मा.श्रीमती हेमांगीताई पाटील, प्राचार्य डॉ मृत्युंजय कापसे ,संस्थेचे खजिनदार मा.श्री.अनिल कवडे कायमसेवक प्रतिनिधी मा.श्री.गणेश चव्हाण ,संस्थेचे सर्व मुख्याध्यापक व कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेतला.