भगूर शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी
वटपौर्णिमेचा सन भगुर शहरात महिलानी मोठ्या उत्साहाने साजरा केला. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा, त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात. यादिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्व आहे. असे म्हणतात यादिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साताजन्मासाठी मिळतो. तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे भगूर शहर तसेच परिसरातील महिलांनी विधीवंत पूजन केले भगूर येथील दशक्रिया घाट येथे सामाजिक कार्यकर्ते कैलास भोर यांनी केलेले सुशोभीकरण बघून आज महिला वर्गाने वट सावित्री पूजनासाठी भरपूर गर्दी केली व सुंदर झाडे व वातावरण बघून फोटो सेशन केले