.📍सांगलीकरांची संतप्त हाक 🗣️
निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेते व्यस्त असताना 🏃♂️, सांगली-मिरज-कुपवाड शहरातील सामान्य नागरिक मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. शहरात सुमारे ६० टक्के भागात अपुरा पाणीपुरवठा होत असून 💧, पाणी येत नसतानाही भरमसाठ पाणी बिले येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. "वॉटर ऑडिट" करून शहराला मुबलक पाणी द्यावे, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
पाण्याच्या प्रश्नासोबतच शहरात सुमारे २५ हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे 🐕. या कुत्र्यांनी लहान मुलांवर आणि वृद्धांवर केलेल्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले असून 😨, प्रशासनाने याचा तातडीने बंदोबस्त करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रखडलेली ड्रेनेजची कामे आणि खराब झालेले रस्ते यामुळे "स्मार्ट सिटी" चे स्वप्न फक्त कागदावरच उरले आहे का? 🏗️ असा प्रश्न विचारत, "मतदारांनी दाद कोणाकडे मागायची?" असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ❓
- मनोज भिसे,
अध्यक्ष :-लोकहित मंच सांगली.