आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपत्ती काळात करावयाच्या कार्यवाही बाबतची sop चे अनावरण करण्यात आले.
मा. खासदार विशालदादा पाटील, मा. आमदार सुधीरदादा गाडगीळ, मा. आमदार इद्रिसभाई नायकवडी, मा सत्यम गांधी आयुक्त , अति आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व प्रशासनाची तयारी बाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मा आयुक्त यांनी मान्यवरांचे स्वागत केले .
सदर बैठकीस मनपा , वीज वितरण कंपनी, पाटबंधारे विभाग , पोलीस विभाग ,महसूल विभाग इत्यादी विभागाचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.
सहा आयुक्त नकुल जकाते आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी प्रशासनाने आज
अखेर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत केलेल्या कार्यवाही बाबत सादरीकरण केले.
मनपा , वीज वितरण कंपनी, पाटबंधारे विभाग , पोलीस विभाग ,महसूल विभाग इत्यादी विभागाने समनव्याने संभाव्य पूर परिस्थितीत कामकाज करून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही या बाबत दक्ष राहावे असे मा खासदार विशालदादा पाटील यांनी सांगितले आहे.
आमदार इद्रिसभाई नायकवडी यांनी पूर काळात पूर पातळी नागरिकांना वेळेत कळणे आवश्यक आहे, त्या बाबत बोर्ड लावून माहिती देण्या बाबत या वेळी नियोजन करावे असे सूचित केले आहे,
मा. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगली मधील महत्वाच्या भागा मध्ये पूर काळात काही अडचणी निर्माण होत असतात त्या मध्ये पिण्याचे पाणी, लाईट ,इत्यादी बाबत इतर विभागाच्या समनव्याने या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे, असे नमूद केले आहे.
उपस्थितीत मान्यवरांनी महापालिका आयुक्त आणि सर्व खाते प्रमुख यांच्या टीम ने चागले नियोजन करून कामकाज करत आहेत त्या बदल समाधान व्यक्त करून आपत्ती काळात सर्वांनी चांगली कामगिरी बजावऊन नागरिकांना त्रास होणार नाही यांची काळजी घ्यावी असे नमूद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत,
मा आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील धोकादायक इमारती बाबत आढावा घेण्यात आला आहे, त्या बाबत कारवाई करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, सहा आयुक्त आणि अतिक्रमण टीम यांच्या माध्यमातून सदरची कारवाई करण्यात येणार आहे असे यावेळी सांगितले आहे,
नाला वरील अतिक्रमण बाबत देखील पाहणी करून कारवाई होणार आहे, टीम तयार करून सूचना देण्यात येणार आहे, असे नमूद केले आहे,
सर्व प्रशासन अलर्ट असून योग्य ती सर्व दक्षता घेऊन कार्यवाही साठी आम्ही सज्ज आहे, निवारा केंद्र ,त्या मधील पूर बाधित नागरिकांची व्यवस्था या बाबत नियोजन पूर्ण झाले आहे,
पूर क्षेत्रा बाहेर निवारा केंद्र आणि नागरिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले आहे,
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ ,उप आयुक्त शिल्पा दरेकर , विजया यादव, स्मृती पाटील शहर अभियंता पृथ्विराज चव्हाण , कार्य अभियंता कुरणे , सहा आयुक्त, अधिकारी , तसेच वीज वितरण ,पाटबंधारे विभागाचे, महसूल विभाग कडील अधिकारी देखील उपस्थितीत होते ,