ऑनलाईन फेरफार मध्ये विलंब, नागरिकांना होतोय त्रास : स्वप्निल खोत ( सामाजिक कार्यकर्ते)

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/05/2025 8:15 PM

मा तहसीलदार सो,
महोदय,
दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी विक्री तारण गहाण हक्कसोड पत्र वाटणी पत्र बक्षीस पत्र इत्यादी कागदपत्रे ची नोंद झाले नंतर नागरिकांच्या सोयी साठी शासनाने ऑनलाईन फेरफार ची सुविधा उपलब्ध केली आहे जेणे करून नागरिकांना संमधीत तलाठी कार्यालय येथे नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत.
परंतु मिरज तालुक्यातील कित्येक तलाठी कार्यालय कडून सदर चे काम नागरिकांच्या सनद नुसार होताना दिसत नाही त्यामुळे शासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन सुविधेस आपल्या महसूल विभाग मार्फतच दिरंगाई केली जाते.
दुय्यम निबंधक कार्यालय कडून ऑनलाईन फेरफार गेल्या नंतर त्या वर 21 दिवसात मंडल अधिकारी यांनी निर्णय घेणे बंधनकारक असताना संमधीत तलाठी दुय्यम निबंधक कार्यालय कडून आलेले ऑनलाईन फेरफार 20 ते 25 दिवस घेत नाहीत त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन फेरफार दिसत नाहीत.
त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालय येथे हेलपाटे मारावे लागतात.
या मागे यांचे आर्थिक हित साठी फेरफार प्रलंबित ठेवत आहेत असे वाटते.
त्या आपण त्वरित मिरज तालुक्यातील जे तलाठी ऑनलाईन फेरफार बाबत दिरंगाई करत आहेत त्यांना आपल्या वतीने सूचना द्यावेत ही विनंती..


*स्वप्नील खोत,
सामाजिक कार्यकर्ते कुपवाड..

Share

Other News

ताज्या बातम्या