सध्या स्मार्ट मीटर बाबत सगळीकडे बोंबाबोंब चाललेली आहे.
आपल्या मिरज तालुक्यातील बुधगाव व बिसूर मध्ये त्याची पहिली बिल आली आहेत ती साधारण तीन ते चार पटीने वाढवून आले आहेत त्यासाठी मोर्चे मीटर बदला म्हणून रेटा लागला आहे
आता तर कहर झाला आहे विश्रामबाग येथील एका अपार्टमेंट मध्ये परस्पर महावितरणच्या खाजगी ठेकेदाराने मीटर बदलल्यामुळे
जुने मीटर चोरीला गेले आहे अशी तक्रार दाखल करण्यासाठी सदर ग्राहक विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत
ह्या माध्यमातून महावितरण ला आव्हान आहे परस्पर मीटर बदलू नका अन्यथा मोठ्या परिणामाला सामोरे जायला लागेल.
राज्य सरकारने सुद्धा याबाबत तात्काळ हस्तक्षेप करून थांबवावेत अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील.
ज्या ठिकाणी अशा पद्धतीने परस्पर स्मार्ट मीटर बसवली जातील त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जुन्या मीटर चोरीची तक्रार दाखल करावी.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.